परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे ,परंतु राज्यात अनेक जिल्ह्यात सध्या पावसाने धुमाकूळ मांडला असून काल झालेल्या पावसाने चक्क पुणे शहर आणि जिल्ह्यात त्रेधा तिरपट उडाली आहे .
विदर्भात सगळीकडे जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला असून सोलापूर सारख्या जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने काही प्रमाणात का होईना शेतकरी बांधव उल्हासात होते.
परंतु काळ पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली असून काही काळ थरार निर्माण झाला होता. पुणे शहरात पर्वती,भिवडी ,सहकार नगर इत्यादी भागात पावसाने हाहाकार माजविला होता.
हवामान खात्याने पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविली आहे.