Breaking News
Home / बातम्या / नागपूर मत्स्य व विज्ञान विद्यापीठांतर्गत आधुनिक पद्धतीने ‘बोर्डो पेस्ट’ बनविण्याचे प्रात्यक्षिक.

नागपूर मत्स्य व विज्ञान विद्यापीठांतर्गत आधुनिक पद्धतीने ‘बोर्डो पेस्ट’ बनविण्याचे प्रात्यक्षिक.

नागपूर : महाराष्ट्र मत्स्य व विज्ञान विद्यापीठांतर्गत अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, दूधबर्डी ता. कळमेश्वर, जि. नागपूरच्या वतीने ग्राम पंचायत कनीयाडोल, ता. कळमेश्वर, जिल्हा नागपूर येथे ‘बोर्डो मलम’ प्रात्यक्षिक आयोजन प्रा. डॉ. अनिल भिकाने संचालक, विस्तार शिक्षण, मपमविवि आणि डॉ. सारीपुत लांडगे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, दूधबर्डी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते.


डॉ. अमोल हरणे, विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) यांनी प्रात्यक्षिकमध्ये शेतकऱ्यांना बोर्डो मलम(पेस्ट) आधुनिक पद्धतीने बनवण्याची पद्धत सांगितली.   यामध्ये  १०लिटर पाण्यात १ किलो चुना + १ किलो मोरचुद + २० मिली किटकनाशक (क्लोरीपॉरिफोस किवा डायक्लोरोवोस) टाकावे. या पद्धतीमुळे बोर्डो पेस्ट बरोबर कीटकनाशक वापरल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होऊ शकतो.  


या  पद्धतीमूळे बुरशीजन्य रोगांचे व किडींचे नियंत्रण करता येते. जसे की ,संत्र्यावरील डींक्या रोगाचे तसेच साल खाणाऱ्या अळीचे व वाळवी या किडीचे  व्यवस्थापन करता येते. त्याचप्रमाणे बोर्डो मलम करतांना घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले. प्रात्यक्षिकमध्ये २० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अश्विनी गायधनी (विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या) श्री. तुषार मेश्राम  (विषय विशेषज्ञ, कृषी विस्तार), मयुरी ठोंबरे (विषय विशेषज्ञ, गृह विज्ञान) आणि श्री. विजय ठाकरे यांनी परिश्रम घेतले.

About Editor Desk

Check Also

महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे शनिवार व रविवारी सुरू राहणार

यवतमाळ: महावितरणने थकीत वीजबिल वसूल मोहीमेला अधिक गती दिली आहे. या मोहिमेत थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होऊ नये व त्यांना सुट्टीच्याही दिवशी आपल्या चालू अथवा थकीत वीजबिलांचा भरणा करता यावा यासाठी महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे शनिवार व रविवार या सार्वजनिक  सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आले आहे.                      महावितरणला आपल्या ग्राहकाच्या वीजेची गरज भागविण्यासाठी दरमहीन्याला विजेचे नियोजन करावे लागते.शिवाय त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करतांना विजेचे बिल नियमीत आणि वेळेवर वसूल होणे गरजेचे असते.परंतू तसे होत नसल्याने महावितरणला वसूली मोहीम राबवावी लागते आणि या मोहिमेत थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा कट करण्याची कटू कारवाई करावी लागते.               थकीत वीज बिल वसूलीशिवाय गत्यंतर नसल्याने महावितरणकडून वसूलीला जोरदार वेग देण्यात आला आहे.या मोहिमेत वीजबिल न भरणाऱ्यां थकबाकीदार ग्राहकांचा केंव्हाही वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे महावितरणची कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी महावितरणची वीजबिल भरणा केंद्राचा, तसेच आठवड्यातील चोवीसही तास सुरू असणारे महावितरणच्या मोबाईल एपव्दारे किंवा  महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेत स्थळाचा वापर करून  ऑनलाईन पध्दतीनेही वीजबिल भरना करण्याची सोय उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *