ग्लोबल वार्मिंग ने पर्यावरणाचा बदलता समतोल दिवसेंदिवस मानवीय हाताबाहेर जात असून पावसाचे बिघडलेले वेळापत्रक हे त्याचेच द्योतक आहे.
यंदा पाऊस परतीची वेळ होऊन सुद्धा काढता पाय काही घेत नाही,अश्यातच यंदा महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये यंदा पावसाने सरासरी पेक्षा धुव्वाधार बॅटिंग केल्यावर सुद्धा वरूण राजा महाराष्ट्रावर प्रसन्न आहे. यंदा सरासरी पेक्षा ३२ टक्के जास्ती म्हणजेच १३२८.५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली.
महाराष्ट्रात कोल्हापूर,सांगली आणि आता नुकतेच पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने जन – जीवन विस्कळीत केले होते
हळुवार पावलं टाकीत आलेला मॉन्सून आता मात्र पूर्ण बरसून सुद्धा काढता पाय घेईना,महाराष्ट्रातील अनेक भागात थंडीची चाहूल सुरु झाली आहे .रात्रीच्या तापमानात अनेक पटींनी घट झाली असून पहाटेच्या वेळी थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. यापुढील दिवसांमध्ये थंडीचा आलेख उंचावत राहणार आहे,जोरदार झालेल्या पावसामुळे रात्री सोबतच दिवसाच्या तापमानात घट होऊन कडाक्याची थंडी लवकरच सुरु होण्याची दाट शक्यता नजीकच्या काळात निर्माण झाली आहे. एकूण काय यंदाची थंडी गारठवणारी असेल असा अंदाज सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे .