भारत सरकार कडून अलीकडे कांद्याचे वाढलेले दर लक्ष्यात घेऊन ग्राहकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने केंद्रीय वाणिज्य मंत्रालय- परराष्ट्र व्यापार विभागाच्या महासंचालकांनी परिपत्रक काढून कांदा निर्यात करण्यावर बंदी घातलेली आहे.
गेल्या काही दिवसां मधे कांद्यामुळे ग्राहकांच्या डोळ्यात वाढलेल्या भाव -वाढीमुळे पाणी आल होत ,आणि बाजारपेठेमध्ये कांद्याची टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण होउ घातलेलीअसतांना केंद्र सरकारने दखल घेऊन कांदा निर्यात थांबविण्याचा निर्णय घेऊन भारतीय बाजारपेठेत मुबलक कांदा उपलब्ध करण्याचा निर्णयांनी घेतला आहे ज्याद्वारे कांद्याच्या वाढत्या दराला चाप लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीचा विरोध ठिकठिकाणच्या बाजार समितीत आंदोलन करून शेतकरी आणि व्यापारी मंडळींनी निषेध नोंदविला आहे.
केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीचा ग्राहकांना फायदा होतो की नाही ते लवकरच कळेल .